पाचगणी प्रतिनिधी
शिवराज उद्योग समूहाच्या माध्यमातून आमच्या सरकारने राज्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या योजना या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे आरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कासवंड येथील प्रतिपादन .!
शिवराज उद्योग समूहाच्या कार्यालयाचे कासवंड येथील राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे पी आरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी कवाडे बोलत होते कवाडे म्हणाले हे कार्यालय नसून अशिक्षित असणाऱ्या लोकांचा हा आधार आहे या कार्यालयात शाळकरी मुलांकरिता व लोकांकरिता झेरॉक्स उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले शेती पूरक शासकीय योजनांची माहिती हे सर्व येथून पुरवली जाईल अशी ग्वाही पूनम ताई गोळे यांनी दिली असल्याने येथील लोकांना शेतकऱ्यांना ती फायदेशीर ठरणार आहे यामुळे लोकांची हेळसांड थांबणार आहे, ही पुनम गोळे ताईंची संकल्पना खूप छान आहे असा विचार प्रत्येक खेड्यातील प्रत्येक युवा व्यावसायिकाने केला पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या सरकारने या राज्यकरिता बनवलेल्या योजना पुनम ताई गोळे यांच्या या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील व लोकांना त्या गोष्टीचा पुरेपूर लाभ मिळेल त्यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो आणि थांबतो असे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व लघुउद्योग विकास महामंडळाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

